ग्रामस्थांना पतीला वाचवण्यात यश आलं,पण नवविवाहितेचा होरपळून अंत... कसा घडला अपघात ?

Nov 11, 2025 - 11:01
Nov 11, 2025 - 11:04
 0  892
ग्रामस्थांना पतीला वाचवण्यात यश आलं,पण नवविवाहितेचा होरपळून अंत... कसा घडला अपघात ?

आय मिरर 

जळगाव शहरात भीषण आगीची घटना घडली आहे.या घटनेत नवविवाहितेचा होरपळून मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार चार चाकीतून संभाजीनगरला पती-पत्नी निघाले होते. कारमधून जाताना त्याच्या चार चाकी कारचा टायर फुटला आणि गाडी दुभाजकाला धडकली.या घटनेत कारने पेट घेतला आणि यात कारमधील नवविवाहितेचा होरपळून मृत्यू झाला.कारमधून तिच्या पतीला वाचवण्यात यश आलं, मात्र 21 वर्षीय विवाहित महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला.

जान्हवी मोरे या त्यांचे पती संग्रामसिंग जालीमसिंग मोरे यांच्यासह कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या. गाडी पिपळगाव फाटा, पहुरजवळ आली होती. त्यावेळी कारचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून लगेचच धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

ग्रामस्थांनी काचा फोडून पतीला बाहेर काढलं, पण पत्नीला बाहेर काढता आलं नाही...

संभाजीनगरकडे संग्राम मोरे आणि त्यांची पत्नी जानव्ही मोरे, वय वर्ष 21, या आपल्या चारचाकी वाहनाने संभाजीनगरकडे निघाले होते. मात्र पिंपळ गाव फाटा पौड जवळच त्यांच्या गाडीच्या अचानक टायर फुटला आणि दुभाजकावर गाडी जाऊन धडकली. यात गाडीने अचानक पेट घेतल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी काचा फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढलं. त्यांना बाहेर काढल्यानंतर गाडीने अधिकच पेट घेतला. संग्राम मोरे यांनी नागरिकांना सांगितलं, की पत्नी माझी गाडीमध्ये अडकलेली आहे. त्यावेळी ग्रामस्थांनी महिलेलाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

सुरुवातीला कारमध्ये आणखी एक महिला असल्याचं स्पष्ट झालं नव्हतं. मात्र, संग्राम मोरे यांनी आत पत्नी असल्याचे सांगितल्यानंतर बचावकार्य अधिक वेगाने सुरू झालं. ग्रामस्थ, वाहतूक पोलीस, पहूर पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत दगडांनी काचा तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत कारला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि आग भडकत गेल्याने जान्हवी यांना बाहेर काढणं शक्य झालं नाही.

परिणामी, जान्हवी मोरे यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पेटलेली कार विझवण्यासाठी पाण्याचे टँकर मागवण्यात आले. थोड्याच वेळात जामनेर नगरपरिषद अग्रिशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. गाडी विझल्यानंतर जान्हवी मोरे यांना बाहेर काढण्यात आलं, पण जान्हवी मोरे यांचा मृत्यू झाला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow