Pandharpur अपघाताचा थरार 9 जणांचा जागीच मृत्यू ; सिद्धनाथाचं दर्शन करुन परतताना भयंकर घडलं

Jun 14, 2026 - 19:57
Jun 14, 2026 - 20:11
 0  1812
Pandharpur अपघाताचा थरार 9 जणांचा जागीच मृत्यू  ; सिद्धनाथाचं दर्शन करुन परतताना भयंकर घडलं

आय मिरर 

पंढरपूरच्या रांजनी गावात भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला आहे.

या अपघातात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ग्रुप पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील असल्याची माहिती आहे. 

म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला हा अपघात घडला. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडून हा मोठा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी अपघातात ७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जेसीबी व इतर यंत्रणाच्या सहाय्याने पोलिसांना सात जणांना वाचवलं आहे.

या रोडवर अशा दोन ते तीन धोकादायक विहिरी असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली. ही विहीर हायवेपासून १० फूट अंतरावर आहे अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ सरजू चव्हाण यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow