पळसदेव मध्ये दिवसाढवळ्या लोकवस्तीत ओमनी व्हॅन पेटली,कारण गुलदस्त्यात ! मग नक्की घडलं तरी काय ?

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात ऐन उन्हाळ्यात ओमनी कारला आग लागल्याची घटना शनिवारी दि.19 एप्रिल रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. मानवी लोक वस्तीत या कारला आग लागल्याने लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील आर्यन पंप्स या कंपनीच्या मदतीने तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यात आली. जर ही आग भडकली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
आर्यन पंप्स या कंपनीच्या यश पगारे, अक्षय साळुंखे, बालाजी अरबाज आणि अधिकारी नवाज यांनी तातडीने अग्निशामक ची मदत उपलब्ध करून दिल्याने ही आग आटोक्यात आली. या घटनेला आता तब्बल 24 तास ओलांडले तरी देखील या संदर्भात कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं ठोस कारण समोर आलं नसलं तरी बेकायदेशीरपणे एका ओमनी व्हॅन मध्ये घरगुती वापराच्या एलपीजी टाकी मधून गॅस भरत असताना गॅसची गळती होऊन गाडीने पेट घेतल्याची जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसदेव गावात अनधिकृतरीत्या एलपीजी गॅस सिलेंडर मधून धोकादायक पद्धतीने व अवैधरित्या गॅसवर चालणाऱ्या वाहनात घरगुती वापराचा गॅस भरला जात होता हे या घटनेमुळे उघड झाले आहे. याचवेळी अचानकपणे गॅस लिक झाला आणि आग लागली वाहनाने पेट घेतला आणि आग नियंत्रणाबाहेर गेली. त्या ठिकाणीजवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र, देवीचे मंदिर व मानवी लोकवस्ती आहे. जर ही आग भडकली असते तर मोठा अनर्थ घडला असता.
दररोज ८ ते १० सिलिंडरमधून काढला जातो गॅस...
पळसदेव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही अंतरावर स्थानिकांकडून दररोज आठ ते दहा एलपीजी गॅस टाकीची साठवणूक करून गॅसवर चालणाऱ्या वाहनांमध्ये तो बेकायदेशीरपणे भरून देण्याचे काम केले जाते. शनिवारी एका मारुती व्हॅनमध्ये गॅस भरत असताना या ठिकाणी आग लागून ही दुर्घटना घडली.या संदर्भात कोणीही गांभीर्याने कोणीही तक्रार दाखल न केल्यानं घडलेली गंभीर घटना व होत आलेला हा गॅस चा अवैध्य दुरुपयोग गुलदस्त्यातच राहिला.
घरगुती वापराच्या गॅस चा अवैध्य दुरुपयोग कोण रोखणार ?
दिवसाढवळ्या मानवी लोकवस्तीत बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या एलपीजी गॅस चा असा होत असलेला गैरवापर कोण रोखणार असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित केला जात आहे.एवढी मोठी घटना घडली तरी देखील प्रशासनाला याची माहिती नाही,पोलीस खात्यात कोणता गुन्हाही दाखल नाही. मग अशा पद्धतीने होणारा गैरवापर रोखला तरी कसा जाणार ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जर हे वेळीच नाही रोखलं आणि उद्या याच घटनेची पुनरावृत्ती झाली तर याला जबाबदार कोण ? असाही सवाल या घटनेच्या निमित्ताने विचारला जातोय.
What's Your Reaction?






