कुंडमळा येथील पडलेला पूल सडलेला होता,दुर्घटनेच्या कारणांची चौकशी होणार, दोषींवर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

Jun 15, 2025 - 18:18
 0  844
कुंडमळा येथील पडलेला पूल सडलेला होता,दुर्घटनेच्या कारणांची चौकशी होणार, दोषींवर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार

आय मिरर 

मावळ मधील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगवेगळी माहिती मिळत आहे एनडीआरएफ ची टीम त्या ठिकाणी गेली आहे. इतर प्रशासन ही तिथं गेल आहे.

प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की त्या ठिकाणी जो लोखंडी ब्रिज होता तो सडलेला होता. जास्त लोक त्या ठिकाणी उभे राहिले आणि मोटार सायकल जात होत्या त्यामुळे तो खाली पडला. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.त्या ठिकाणी आठ कोटीचा एक नवीन पूल मंजूर असल्याचाही अजित पवार यांनी सांगितला आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत.

या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow