माळेगावच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं असं म्हणता येणार नाही : शरद पवार

Jun 18, 2025 - 10:20
Jun 18, 2025 - 10:22
 0  606
माळेगावच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं असं म्हणता येणार नाही : शरद पवार

आय मिरर 

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वत्र या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा चेअरमन म्हणून स्वतःच्या नावाची ही अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून तर शरद पवार गटाकडून ही बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानात आहे. यासोबतच माळेगांव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वातील बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात आहे.

कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेत. या सर्व घडामोडीमुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान या निवडणुकीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाष्य केला आहे.या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हा स्थानिक प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.

या निवडणुकीकडे बारामतीच्या आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे ही लक्ष इथे नाही.या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आणि आजही नाही. परंतु एक विशिष्ट स्थिती निर्माण झाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्यामुळे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले चार दिवसांनी निकाल आहे काय होतंय ते पाहू असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं.आजचा 19000 सभासदांचा प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी जाहीर सभेत उपस्थित केलेल्या सूतगिरणीच्या प्रश्नावरूनही शरद पवार यांनी उत्तर दिला आहे.बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माळेगाव साखर कारखान्याच्या बाबतीत हा उसाचा भाग आहे त्या प्रमाणात सभासद होतात.एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही.चंद्रराव तावरे यांच्याशी काही लोकांचे बोलणं झालं होतं, त्यांना अडचण होती त्यामुळे आम्ही ताणले नाही असेही शरद पवार यांनी म्हटलं.

आर्टिफिशियल तंत्रज्ञानासंदर्भात बारामती मध्ये एक कार्यशाळा पार पडणार आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मान्यवर येणार आहेत त्यामुळे माझं तिकडं लक्ष आहे. माळेगावच्या निवडणुकीकडे माझं लक्ष नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शेतकरी यांचे हित साधले जाईल असे मला वाटते महाराष्ट्र सरकारने काल 500 कोटीचा जो निर्णय घेतला आहे त्याचा मी स्वागत करतो. महाराष्ट्र सरकारने ऊस आणि इतर पिकां बाबत आई तंत्रज्ञान वापरण्याचे धोरण फायनल केले.हे फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला गेला असेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असेही शरद पवार यांनी म्हटलं. महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य आहे की ए आय स्वीकारत आहे त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो असंही पवार म्हणाले.

माळेगाव साखर कारखाना हा शरद पवारांच्या नावाने ओळखला जातो अशी चर्चा आहे यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले,ठीक आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या नावाने ओळखला जातो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow