'बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू' जरांगे पाटलांचे मुंडे बहिणभावावर गंभीर आरोप

May 16, 2024 - 18:49
May 16, 2024 - 18:52
 0  375
'बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू' जरांगे पाटलांचे मुंडे बहिणभावावर गंभीर आरोप

आय मिरर

बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांची मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलासुद्धा धमकी देत आहेत, बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये येऊ द्यायचं नाही, असं म्हणत आहेत. आता तर मी रोज बीडमध्ये येणार आहे. दोघं बहिणभाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले आहेत.

जरांगे पाटील यांचे मुंडे बहिणभावावर गंभीर आरोप

जरांगे पाटील म्हणाले, उपोषणाला नाव ठेवलं, त्यावेळेस विरोध केला. पण, एकदाही म्हणलो नाही पंकजा ताईला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. पण हे आम्हाला माहीत आहे की वेळ निघून गेले की असं होणारच. मी बलिदान देण्यासाठी तयार आहे. मात्र, मी मागे हटणार नाही. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत तर तुमच्याही नेत्याना महाराष्ट्रात फिरायच आहे. तुमची गुंडगिरी आम्ही किती दिवस सहन करायची?

आमच्याकडेही खूंखार लोक आहेत. एवढा कच्चा लेचां पेचा मराठा समाज नाही. तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात आणि मुंबई, पुणे, संभाजीनगरला फिरायचं आहे. मला बीडमध्ये येऊ देणार नाहीत, असं म्हणत आहेत. मराठा समाजाचे असे उपकार फेडता का? तुमच्या व्यासपीठावर मराठा समाजातील नेत्यांना बसायला जागा नव्हती, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

तलवारीचे देखील वार आहेत. आयाबहिणींना देखील मारहाण केली आहे. मराठ्यांची मत लागतात, मराठ्याचे नेते प्रचाराला लागतात. मराठ्यांच्या मतावर मोठे व्हावे लागते. पण गोरीगरीबांबरोबर अन्याय हे प्रत्येक वर्षी सुरू आहे. स्वतःचे संकट अंगावर आहे. त्यावेळेस आपल्या पाया पडतात आणि संकट निघून गेलं की लगेच. आष्टी पाटोद्यात काय झालं? बीडमध्ये काय झालं? माजलगाव आणि परळीमध्ये काय झालं? संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.

मलाही धमकी देत आहेत : मनोज जरांगे पाटील

मराठ्यांच्या जीवावर मोठं होऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा असेल तर मराठा जीव द्यायला तयार आहेत. दोघा बहिण भावांचा विषय आहे, शेवटी मराठा मत घ्यायची मोठे व्हायचं. कोणत्याही पक्षात राहायचं आणि मोठ व्हायचं. हा खरा अपमान मराठा नेत्यांचा आहे. जात संपली तर नेत्यांना काय किंमत राहणार? शंभर चुका होऊ द्या, शेवटी नावालाच होईल. मला सुद्धा धमकी देत आहे बघून घेऊ, कचाट्यात ये मारून टाकू, मला बीडमध्ये येऊ द्यायचं नाही असं म्हणत आहेत. आता तर मी रोज बीडमध्ये येणार आहे. दोघं बहिण भाऊ कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावत आहेत. मलाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, मी कधी म्हटलं पंकजाताईला फिरू देऊ नका? मी प्रत्येकाला फिरण्याचा अधिकार आहे, असं लोकांना समजून सांगत होतो, असं जरांगे पाटील यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow