जगाच्या पोशिंद्याबद्दल तुमची एवढी नीच मानसिकता ! कोकाटे राजीनामा द्या : श्रीकांत करे

आय मिरर
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत.कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते अजित पवारांनी जाणीवपूर्वक दिले आहे असे विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. कोकाटे यांच्या या विधानावरून पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष एडवोकेट श्रीकांत करे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
माणिकराव कोकाटे यांच्या या विधानाचा पुणे जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष अडवोकेट श्रीकांत करे यांनी निषेध नोंदवला आहे. असले कृषी मंत्री असल्यावर शेतकऱ्यांचा विकास कसा होणार ? पावसाळी हंगामाची तयारी करण्याऐवजी हे कृषिमंत्री सरकारच्या वतीने अशी चुकीचे विधाने करणार असतील तर त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो.
माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच मंत्रालयाच्या बाबतीत जर तुमची इतकी नीच मानसिकता असेल तर तुम्ही तात्काळ राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडा अशी मागणी एडवोकेट श्रीकांत करे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी असल्या कृषीमंत्र्यांना लाथ घालून बाहेर काढलं तरच शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीतरी जाणीव आहे असं समजून येईल कारण तुमची जी शेतकऱ्यांबद्दलची भावना आहे,ही या वक्तव्यातून व्यक्त होते. तुम्हाला मलईदार खाती पाहिजेत काम करायला नको, बोगस बियाणा असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील यावर काम करण्यापेक्षा जर कृषिमंत्री अशी विधान करत असतील तर या विधानाचा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने आम्ही निषेध नोंदवतो. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे हकलपट्टी केली पाहिजे अशी मागणी ऍडव्होकेट करे यांनी केली आहे.
अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यावरून ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य केल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर टीका होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने १७ पिकांसाठी सुमारे दीडपट हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.अजित पवार यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आता मदतीच्या आशेने सरकारकडे पाहत आहेत. त्यातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना त्यांनी "ढेकळांचे पंचनामे करायचे का?" असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
What's Your Reaction?






