जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारीच राहणार : दादांचा बारामतीकरांना वादा 

Jun 17, 2025 - 19:57
Jun 17, 2025 - 20:18
 0  317
जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना सहकारीच राहणार : दादांचा बारामतीकरांना वादा 

आय मिरर 

तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सहकारी साखर कारखाने देता येणार नाहीत असा निर्णय केला होता त्यामुळे राज्यांमध्ये खाजगी सहकारी साखर कारखानदारी वाढली.माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरून सध्या विरोधक आरोप करत आहेत की अजित पवार यांना सहकार मोडीत काढायचा आहे.

माळेगाव कारखान्याचे खाजगीकरण केलं जाईल परंतु जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार असा वादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केला आहे.

बारामती तालुक्यातील मळद या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ सभा पार पडली या सभेत अजित पवार बोलत होते.

विरोधक अशी चर्चा उठवतात की राजवर्धन शिंदे,किरण गुजर नितीन सातव हे चंद्रराव तावरे यांना भेटायला गेले होते. त्यांनी त्यांच्यापुढे तुम्ही पाच वर्ष कारखान्याचे चेअरमन व्हा असा प्रस्तावही ठेवला मी असं म्हणतो की त्यांना कोणी पाठवलं होतं ? मला त्यांना पाठवायची गरज काय ? कुशाल काहीही बोलतात,इतक्या मोठ्या वयाच्या व्यक्तीच विस्मरण होत,अशा व्यक्तीच्या हातात लाख लोकांचा प्रपंच देण चुकीचं होणार आहे.

असं म्हणत अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अजित पवार म्हणाले की,वय 85 झाल्यावर कुठेतरी थांबावं लागतं तुम्हाला धरून चालवावे लागत बसवावे लागत.आई असेल चुलता असेल कुणी जरी असलं तरी विस्मरण होतं.मी अण्णा तुम्हाला सांगतो तुमची दैदीप्यमान कारकीर्द आहे त्यापेक्षा जास्त 21 संचालकांच्या सोबतीने मी कारकीर्द करून दाखवतो. 

मळदच्या सरपंचाने काही निवेदने दिली आहेत मी त्याबद्दल बोलणार नाही कारण मी उमेदवार आहे. पुन्हा म्हणतील आचारसंहितेचा भंग केला उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून लोकांना प्रलोभन दाखवले.

फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न...

मी परवाच सांगितले ऑल इन वन हे आपल्याला करायचे आहे.आता काळ आपला आहे,माझा आहे मी करून दाखवणार आहे मी फुशारकी मारत नाही, मी गर्विष्ठपणाने सांगत नाही.विरोधक म्हणाले 60 हजार होती भिजली. चला गोडाऊन उघडायला लावू किती पोटी भिजली पाहू हा सूर्य हा जयद्रथ करू डोक्याला ताण नको.फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत.

आपला कारखाना कर्जबाजारी नाही कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. घाबरण्याचे कारण नाही.मी जर राज्य सरकारचा अर्थसंकल्प 11 वेळा 13 कोटी जनतेचा मांडू शकतो तर 19750 सभासदांवर अवलंबून असणाऱ्या सव्वा लाख लोकांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता आणू शकत नाही का ?

अण्णांनी म्हणजेच चंद्रराव तावरे यांनी परवा एका सभेत सांगितले की 111 कोटी बेरिंगला खर्च केले, त्यावर त्यांच्यातील एक उमेदवारांनी सांगितले एक कोटी अकरा लाख त्यावर ते म्हणाले तू खाली बस तुला माहित नाही.111 कोटी बरोबर आहे. विस्मरण होतेय हा विस्मरणाचा प्रकार आहे असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवरती टीका केली.

माळेगाव कारखाना माझ्या कार्यक्षेत्रात आहे म्हणून मी स्वतः जबाबदारी घेतोय. मी जबाबदारी स्वीकारल्यावर मागे हटत नाही हे महाराष्ट्र बघितले आहे,जिल्ह्याने बघितले आहे तालुक्याने बघितले आहे तुम्ही बघितले आहे.मुद्दाम मी स्वतः चेअरमन व्हायला निघालो आहे.माळेगाव कारखानाच्या परिसराच काय करायचे तुमच्या हातात आहे,काय कोणाचं कोणावर प्रेम असेल झालं गेलं गंगेला मिळालं आता नवीन पहाट नवीन सुरुवात करूया. मी आता तुम्हाला सुवर्णसंधी दिली आहे त्या संधीचा सोनं करण्याचं काम आणि पॅनल टू पॅनल कपबशी मतदान करण्याचं काम तुम्हाला करायचा आहे. असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow