BIG BREAKING उजनीतून भीमा नदीत 51 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग...

आय मिरर
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, आज रविवारी 27 जुलै रोजी सकाळी सात वाजता धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 36 हजार 600 क्युसेक एवढ्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी दहा वाजता त्यामध्ये वाढ करून तो चाळीस हजार इतका करण्यात आला. त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. दुपारी बारा वाजल्यापासून 16 दरवाज्यातून 51 हजार 600 क्युसेकने विसर्ग केला जात आहे.
उजनी धरण सध्या 96 पूर्णांक 26 टक्के क्षमतेने भरलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवन क्षमतेच्या 115 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय.
मात्र पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये 34 हजार 233 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याची आवक होत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने कालपासूनच भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या विसर्गात हळूहळू वाढ केली जात असून आज सकाळी तो 36 हजार 600 इतका करण्यात आलाय.
उजनी धरणाची एकूण पाणी साठवन क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो.
सध्या उजनी धरणात 115 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून उजनी धरण 96 पूर्णांक 26 टक्के क्षमतेनं भरलेलं आहे.
पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा ओघ वाढल्यास आणि भीमा नदी पात्रात येणारी पाण्याची आवक वाढल्यास उजनीतून केला जाणारा विसर्ग कमी जास्त होऊ शकतो यासाठी भीमा नदी पात्रात कोणीही उतरू नये असं आवाहन उजनी धरण व्यवस्थापनाने केल आहे.
What's Your Reaction?






