नितेश राणें सारखे चिल्लर नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवताहेत ; वाचा कोणी केला हल्लाबोल

Sep 20, 2024 - 18:43
Sep 20, 2024 - 20:52
 0  72
नितेश राणें सारखे चिल्लर नेते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवताहेत ; वाचा कोणी केला हल्लाबोल

आय मिरर

बदलापूरच्या घटनेतील आरोपींना राज्याचं गृहखाते आत्तापर्यंत अटक करु शकले नाही.त्या घटनेतील सर्व आरोपी मोकाट आहे. खासदार संजय राऊत यांनी जी भुमिका मांडली ती बरोबर आहे.मात्र नितेश राणें सारखे चिल्लर नेते या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत.जातीय धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे.

नितेश राणेंवर गृहखात्याने कारवाई करायला पाहिजे पण कारवाई होत नाही.राज्यात दर अर्धा पाऊस तासाला कुठल्या ना कुठल्या मुलीवर महिलेवर अत्याचार होतोय मात्र आरोपी मोकाट असतात. कायदा सुवव्यवस्था बिघडली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत असा हल्लाबोल ही लवांडे यांनी केला आहे.

राज्यातील जे जे आरोपी मोकाट फिरत आहे त्या सर्वांना अटक करायला गृह खात्याची हिंमत नाही का ? असा प्रश्न लवांडे यांनी उपस्थित केला आहे. बदलापूरच्या घटनेत मस्के म्हणत आहेत की तिथले खासदार राष्ट्रवादीचे आहेत. खरंतर त्या घटनेला खासदार जबाबदार नाहीत कारण खासदाराची सत्ता तिथे नाही.त्यामुळे महायुतीच्या सरकारची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ती जबाबदारी आहे असं विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow