आम्ही पोलिस आहोत एवढ्या रात्री का फिरतोय ? तुझ्यावर कारवाईच करतो ! तिघांनी बांगडी व्यवसायिकाला लुटलं

Jun 5, 2025 - 08:10
Jun 5, 2025 - 08:14
 0  1152
आम्ही पोलिस आहोत एवढ्या रात्री का फिरतोय ? तुझ्यावर कारवाईच करतो ! तिघांनी बांगडी व्यवसायिकाला लुटलं

आय मिरर 

पोलिस असल्याची सांगून बांगडी व्यावसायिकास लुबाडणाऱ्या मेहुण्या-पाहुण्यांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीये.या तिघांनी बांगडी, कटलरीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यवसायिकाला अडवून लुबाडलं आहे. कोल्हापूर मधील शिवाजी उद्यमनगर येथे हा प्रकार घडला आहे.

रात्रीच्या वेळेस परत गावाकडे जाताना या तिघांनी त्यांना अडवून आम्ही पोलिस आहे.एवढ्या रात्री कशाला फिरता तुमच्यावर कारवाई करणार अशी भीती घालून तिघांनी त्यांच्याकडून सात हजारांची रोकड काढून घेतली. या तिघांविरोधात फिर्याद दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यानंतर या तिघांना अटक केली.

आय्याज युसूफ मुलानी (वय 23), स्मित संतोष पवार (21, दोघेही रा. करंजेपेठ, सातारा) आणि शुभम तानाजी गायकवाड (28, रा. शिकलगार गल्ली, बागल चौक, कोल्हापूर) अशी आहेत. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कटलरी आणि बांगड्यांचे व्यावसायिक असलेले चिदानंद बामन्ना सुतार (48, रा. जैन बस्ती, दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), हे बांगड्या व कटलरी साहित्य खरेदी करून 28 मे रोजी रात्री उशिरा गावी जात होते. शिवाजी उद्यमनगर येथून जात असताना, तीन संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करत त्यांच्याजवळील 7 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्याचबरोबर त्यांना मारहाण करून ते पळून गेले. सुतार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली आणि त्यांना बागल चौक येथून अटक केली. तिघांनीही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख 4 हजार रुपये, दोन मोबाईल फोन आणि दुचाकी असा 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow