पुण्याच्या उद्योग नगरीत पाकिस्तानी नागरिकांची घरे ? पुण्यात राहतात चक्क 111 पाकिस्तानी नागरिक

आय मिरर
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा 90 दिवसांचा असतो.
सध्या शहरात 111 पाकिस्तानी नागरिक हे भारताचे नागरिकत्व मिळवण्याच्या तयारीत आहेत. शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे परदेशी नागरिकांचे शहरात येण्याचे प्रमाण अधिक आहे.सध्या शहरात 1500 परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत.यात 111 पाकिस्तानी हिंदू नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.चीन मधील 75 नागरिक हे कामानिमित शहरात वास्तव्यास आहेत. बांगलादेश मधील 25 विद्यार्थी हे शिक्षणासाठी शहरात वास्तव करत आहेत.
भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 35 पुरुष आणि 56 महिला या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आले आहेत. तर 20 पाकिस्तानी व्हिजिटर व्हिसावर आले आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देशा सोडून जाण्याचे आदेश दिले असले तरी याबाबत अद्याप परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाकडून गुरूवारी रात्री उशीरापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही, असे पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाच्या निर्धारित नियमानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?






